IslamReligion

शादी जिहाद – सामूहिक बलात्कार, धर्मपरिवर्तन, धमक्या आणि बरेच काही

शादी जिहाद अर्थात लव्ह जिहादने देशभरात आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात. गेल्या काही दिवसांत कानपूरमध्ये, विशेषतः जुही कॉलनीमध्ये हिंदू महिलांना विवाहाचे कारण दाखवून बळजबरीने धर्मांतरित केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या वाढत्या संकटाला आळा घालण्यासाठी योगी सरकारच्या मार्गदर्शनाखाली कानपूर पोलिसांनी सत्यशोधन समितीची स्थापना केली. ही समिती लव्ह जिहाद आणि बळजबरी धर्मांतराच्या आरोपांची चौकशी करीत आहे.  

गेल्या एका वर्षातील एकूण १४ केसेसचा शोध घेतल्यानंतर या सत्यशोधन समितीने २४ नोव्हेंबर रोजी आपला अहवाल कानपूर रेंज इन्स्पेक्टर जनरल यांना सुपूर्द केला. माध्यमांनी ज्या १४ केसेसचीच नोंद केली होती त्याच या समितीने पाहिल्या होत्या, याची नोंद घेतली पाहिजे. त्यामुळे या अहवालात कानपुरातील सर्व केसेसची यादी नव्हती.

काही काळातच डाव्या प्रसारमाध्यमांनी या अहवालाचे चुकीचे अर्थ लावत ‘लव्ह जिहाद’च्या घटनांची बदनामी करण्याचे प्रयत्न करण्यात आला. द वायर या डाव्या प्रचारतंत्राच्या महत्त्वपूर्ण पोर्टलने हा अहवाल चुकीच्या पद्धतीने मांडला. उत्तर प्रदेश सरकार लव्ह जिहादच्या नावाखाली ध्रुवीकरणाची मोहीम चालवत असल्याचे वायरने म्हटले. १४ पैकी ८ केसेसमध्ये एकमत होते, असे समितीच्या अहवालाच्या आधारे या पोर्टलने म्हटले. हे दावे खोटे आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनीही या नोंदींचा अभ्यास केला व त्यात १४ पैकी ११ केसेसमध्ये त्यांना गुन्हा झाल्याचे आढळून आले. ऑपइंडिया या वेबपोर्टलने या समितीच्या अहवालाचे अवलोकन केले. मुस्लिम पुरुषांनी हिंदू महिलांना कशा प्रकारे वश केले याबाबत आरोप करण्यात आले आहेत. खाली दिलेल्या ११ केसमध्ये गुन्हा झालेला दिसून येत असला तरी डाव्या माध्यमांनी त्याचा विचार केला नाही.

केस १ – मुस्लिम युवकाने १४ वर्षीय मुलीला जाळ्यात ओढले, लैंगिक अत्याचार केला आणि धर्म बदलण्यासाठी बळजबरी केली.

कानपुरातील नौबस्ता पोलीस स्थानकात नोंदविण्यात आलेली ही केस या अहवालातील पहिली केस आहे. फतेह खान याने आपण आर्यन मेहरोत्रा असल्याचे सांगून गोपाळ नगर येथील मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. हे प्रकरण ८ सप्टेंबर रोजी उघडकीस आले. समितीच्या अहवालानुसार फतेह खान याला ९ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली व भादसं ३७६ व ४२० तसेच पोक्सो अंतर्गत खटला दाखल करण्यात आला.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, फतेह खान याने हिंदू असल्याचे भासवून संबंधित हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ६ सप्टेंबर रोजी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. दरम्यान तिला मारहाणही केली व आरडाओरडा केल्यास पालकांना मारहाण करण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे आरोपीकडे फतेह खान आणि आर्यन मेहरोत्रा अशी दोन्ही आधार कार्ड होती.

अहवालानुसार फतेह खान याने संबंधित मुलीस इस्लाममध्ये धर्मांतरित होण्यासाठी बळजबरी केली व मरियम फातिमा असे आधार कार्य बनवून घेतले.

केस २

१५ ऑक्टोबर रोजी मोहम्मद वाईस उर्फ बाबू याने आपल्या बहिणीच्या, माही हयात खानच्या मदतीने अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे दोघांनी मिळून तिला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्याचाही प्रयत्न केला. मुलीच्या आईने तिची सुटका केली व दोषींना तुरुंगात पाठवण्यात आले.  

संबंधित मुलीने कोर्टात सांगितले की आरोपीच्या बहिणीने तिला खाली बोलावले आणि मशिदीत नेले. तिथे तिला तीन शब्द उच्चारण्यास सांगण्यात आले ज्याने ती इस्लाममध्ये धर्मांतरित होईल. तिने याला नकार दिल्यावर अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला.

केस ३ – अल्पवयीन हिंदू मुलीचे मुस्लीम मुलासोबत पळून जाण्यासाठी ब्रेनवॉशिंग

२ सप्टेंबर २०२० रोजी अटक करण्यात आलेल्या शाहरूख या मुस्लीम मुलाने १६ वर्षीय हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले व तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. २७ जुलै रोजी नौबस्ता पोलीस स्थानकात मुलीच्या कुटुंबियांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली होती.

अल्पवयीन मुलींचे मुस्लीम तरुणांनी केलेले ब्रेनवॉशिंग आणि प्रेमपाशात अडकविणे याकडे डावी प्रसारमाध्यमे एकमताने तयार झालेले नाते म्हणून पाहतात. तसे द वायरने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. अल्पवयीन मुलींचे ब्रेनवॉशिंग करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर इस्लाममध्ये धर्मांतरित होण्याच्या युरोपात वाढत्या ‘गँग केसेस’चा आढावा घेतला पाहिजे.

केस ४ – मुस्लीम युवकाकडून दलित अल्पवयीन मुलीचे अपहरण, धर्मांतरासाठी बळजबरी, नकार दिल्यास गंभीर परिणामांची भीती

मुस्लीम मुलगा अरिफ याने १४ वर्षीय दलित मुलीचे अपहरण केले व तिला आझमगड येथे नेले. तिथून दिल्ली येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले व इस्लाममध्ये धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने या प्रकरणी पोलिसांना सांगितले की, रागावल्यास वा नकार दिल्यास भयानक परिणांमाना सामोरे जावे लागेल अशी धमकी आपल्याला अरिफने दिली होती.  

मुलीच्या साक्षीत नमूद करण्यात आले आहे की, ती व अरीफ एकमेकांना ओळखत होते. त्याने पीडितेला ट्रकमध्ये बसवून घरी सोडतो असे सांगितले होते. पण तसे करण्याऐवजी तो तिला विविध ठिकाणी घेऊन गेला. तिच्यावर बळजबरी व लैंगिक अत्याचार केले आणि तिला इस्लाममध्ये धर्मांतरित करण्याचा प्रयत्न केला.

कानपुरातील नौबस्ता पोलीस स्थानकात पीडितेने तक्रार दाखल केली आहे. भादसं कलम ३६३, ३६६ आणि एसएसी/एसटी कायद्याच्या विभाग ३(२)५ अंतर्गत त्यास अटक करण्यात आली.

केस ५ – खोट्या कागदपत्रांच्या आधारे मुस्लीम मुलाचे आपण हिंदू असल्याचे भासवत हिंदू मुलीशी लग्न

३२ वर्षीय मुख्तार अहमदने आपली खरी ओळख लपवली आणि स्वतःची राहुल सिंग अशी ओळख सांगत कानपुरातील नौबस्ता येथील २० वर्षीय हिंदू मुलीशी मैत्री केली. तिला आमिष दाखवले व तिचा ब्रेनवॉश केला. अहमदने खोट्या कागदपत्रांच्या आधारे मुलीशी नोंदणीविवाह केली. त्याचे यापूर्वी एक लग्न झालेले आहे हेही त्याने पीडितेपासून लपवले होते. भादसंच्या कलम ४२०, ४६७, ४६८ व ४७१ अंतर्गत खटला दाखल करण्यात आला असून अहमदला अटक करण्यात आली आहे.

केस ६ – ब्रेनवॉशिंग करून हिंदू मुलीला इस्लाम स्वीकारण्याची बळजबरी, मुलीच्या कुटुंबियांचा ‘काळी जादू’ केल्याचा आरोप

मुस्लीम युवकाने व त्याच्या कुटुंबियांनी मुस्कानचे ब्रेनवॉशिंग करून तिला स्वेच्छेने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले. यासाठी काळी जादू आणि अन्य तंत्रमंत्राचा वापर केला गेला असा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे. १४ सप्टेंबर रोडी अरिफला भादसं कलम ३६६ अंतर्गत कानपूर पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या जवाबात पीडितेने कबुली दिली आहे की, अरिफने तिचा धर्म बदलून तिच्याशी लग्न केले होते. तसेच तिच्या परवानगीशिवाय बळजबरीने शारिरीक संबंध ठेवले होते.  

केस ७ – १९ वर्षीय असल्याचे भासवणाऱ्या अल्पवयीन हिंदू मुलीला मुस्लिम मुलाचे लग्नाचे आमीष  

कानपूर येथील गोविंद नगर कच्ची बस्ती येथील सादिक अली याने हिंदू मुलीस १९ वर्षांचे भासवत लग्नाचे आमीष दाखवले व तिला सोबत घेऊन पळून गेला. सादिक अलीच्या विरोधात पीडितेच्या कुटुंबियांनी १३ डिसेंबर २०१९ रोजी तक्रार नोंदवली होती.

पीडितेच्या जवाबात आपण सज्ञान असून आरोपीसोबत स्वेच्छेने पळून गेल्याचे म्हटले होते. तिची वैद्यकीय तपासणी केली असता ती १६ वर्षांची असल्याचे लक्षात आले. पोस्को कायद्यांतील विविध विभागांतर्गत केस दाखल करण्यात आली व आरोपीस तुरुंगवास सुनावण्यात आला.

केस ८ – मुस्लीम युवकाने अल्पवयीन हिंदू मुलीला जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार केले व सोडून दिले

समितीच्या अहवालातील पुढील केस कानपुरातील बाबू पुरवा जिल्ह्यातील आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीशी सलमान नावाच्या मुस्लिम तरुणाने मैत्री केली, तिला दिल्लीला घेऊन गेला. तिचे लैंगिक शोषण केले व तिला सोडून तो घरी परतला. पीडिता हरवली असल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी दाखल केली व सलमानला २७ सप्टेंबर २०१९ रोजी अटक करण्यात आली आणि तुरुंगात पाठविण्यात आले. भादसं कलम ३६६ व ३६७ तसेच पोस्को कायद्यांतर्गत त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत.

केस ९ – अल्पवयीन दलित मुलीला घाबरवून मुस्लीम व्यक्तीने तिचे बळजबरी इस्लाममध्ये धर्मांतरण केले, तिचा छळ केला

१६ वर्षीय दलित मुलीला आदिल खान याने आमीष दाखवले व तिला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले. आदिल खान याने तिला घरात डांबून ठेवल्याचा व तिचा छळ केल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. पीडितेने आपल्या जवाबात म्हटले आहे की, मुस्लीम युवकाने तिला काही कागदपत्रांवर सही करायला लावली. त्याचप्रमाणे नकार दिल्यास परिणामांचीही भीती घातली. खोलीत डांबून तिचे लैंगिक शोषण केले.

आदिलने पीडितेला मारहाणही केली होती. पीडितेच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनुसार कानपूर पोलिसांनी आदिल याला ३ सप्टेंबर २०२० रोजी अटक केली. भादसं ३६३, ३६६, २९५अ, ३४२, ५०४, ५०६, पोस्को आणि एससी/एसटी कायद्यांतर्गत त्याला तुरुंगवास सुनावण्यात आला.

केस १० – मोठी बहीणीचा सहमतीने मुस्लीम पुरुषासोबत पळून गेल्याचा दावा, धाकट्या बहिणीची मुस्लीम व्यक्तींकडून लैंगिक अत्याचाराची कबुली

कानपुरातील कल्याणपुरातील दोन बहिणींना पळवून नेल्याचा आरोप शाहरूख नावाच्या दोन मुस्लीम तरुणांवर ठेवण्यात आला. या बहिणी अनुक्रमे १९ व १४ वर्षांच्या होत्या. आपण आरोपींसोबत सहमतीने पळून गेल्याचा आणि त्यांच्यासोबत शारिरीक संबंध ठेवल्याचे या दोघींनी मान्य केले. यांपैकी लहान बहिणीने मुस्लिम व्यक्तींकडून सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. आरोपींवर पोस्को कायद्यांतर्गत तसेच भादसं ३७६ड, ३६३, ३६६ आणि १२०ब अंतर्गत आरोप ठेवण्यात आले व तुरुंगवास सुनावण्यात आला.

केस ११ – दोन दलित बहिणींवर दोन मुस्लीम व्यक्तींची बळजबरी

कानपूरच्या पांकी वसाहतीतील २५ आणि २२ वर्षीय दोन दलित बहिणीं मोहम्मद मोहसिन आणि आमीर यांच्यासोबत पळून गेल्या. ते ही कानपूरातीलच जुही कॉलनीत राहात होते. मोहसिन समीर नाव सांगत मोठ्या बहीणीशी मैत्री केली आणि तिच्याशी विवाह केला. समीरचा मित्र आमीर याने धाकट्या बहिणीशी मैत्री केली. पण त्याचा काहीतरी हेतू असल्याचे लक्षात आल्यावर तिने त्याला भेटणे बंद केले. आमिरशी लग्न न केल्यास भयानक परिणामांना सामोरे जावे लागेल असे सांगत तिला घाबरवण्यात आले. त्याचप्रमाणे त्या दोघींनीन इस्लाम स्वीकारला नाही तरीही परिणामांना सामोरे जावे लागेल अशी भीती दाखवण्यात आली.  

इस्लाम स्वीकारण्यासाठी पीडित मुलींचा जातिवाचक शिव्या देऊन छळ करण्यात आला असेही समितीच्या अहवालात म्हटले आहे.

समितीच्या अहवालानुसार, पीडितेने आपल्या जवाबात सांगितले की, तिचे मोहसिनसोबत मंदिरात लग्न झाले आणि ते दोघे तित्या स्वतःच्या घरात राहात होते. त्यांनी कोर्टात विवाह करण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही. त्यानंतर तिला निकाहनाम्यावर सही करण्यास सांगण्यात आले, पण आपण कशावर सही करत आहोत याची तिला कल्पना नव्हती. त्यानंतर मोहसिनचा मित्र आमीर याने पीडितेच्या धाकट्या बहिणीशी मैत्री केली व तिच्यावर दबाव आणयला सुरुवात केली.   

मुलींच्या वडिलांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून पोलीस सुपरिटेंडेंट दीपक भुकर यांच्या अंतर्गत ही सत्यशोधन समिती स्थापन करणारे कानपूरचे पोलीस अधीक्षक मोहीत अगरवाल यांची भेट घेतली. पांकी पोलीस स्थानकात या प्रकरणी केस दाखल करण्यात आली आहे. मोहसीन खान आणि आमीर यांच्यालक भादसं कलम २९५अ, ३८६, ५०४, ५०६, ५०७ आणि एससी/एसटी कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आले असून तुरुंगात पाठविण्यात आले आहेत.

सर्व ११ केसेसमध्ये अटक आणि तुरुंगवास सुनावण्याच्या मुद्द्यांमध्ये उल्लंघन झाल्याचे समितीला जाणवले. या ११ केसमधील सात केसमध्ये पीडिता या अल्पवयीन आहेत. जुही कॉलनी, कल्याणपूर मधील केसेसचा यात समावेश आहे. यात दोन शाहरूखनी दोन बहिणींना पळवून नेले होते. त्यांपैकी एक जण सज्ञान होती तर दुसरी अल्पवयीन होती. अन्य तीन केसमध्ये पीडिता ही अनुसूचित समाजातील होती.

विशेष म्हणजे, डाव्या माध्यमांना वाटते की सात अल्पवयीन पीडितांबाबत रिपोर्टिंगचा काही योग्य मुद्दा नव्हता. सात अल्पवयीन मुली पळवून नेण्यात आल्या आणि काहींचे बळजबरी धर्मांतरण करण्यात आले. एका पीडितेवर सामूहित लैंगिक अत्याचार करण्यात आला. एवढे असूनही वायरसारख्या पोर्टल्स ‘सहमती’ या मुद्द्याकडे पाहतात, ज्याने लव्ह जिहाद अर्थात ग्रुमिंग जिहाद अस्तित्वात नसल्याचे सिद्ध होते.

पोलीसांनी १४ पैकी ११ केसमध्ये गुन्हा घडला असल्याचे असूनही, सत्यशोधन समितीने पोलीसांचे निवेदन अहवालात जोडलेले असूनही स्वयंघोषित लिबरल्स आणि डावी माध्यमे अजूनही शादी जिहाद म्बहणजेच लव्ह जिहाद ही संकल्पना उजव्या विचारसरणीच्या कल्पनेतून प्रकटल्याचे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहेत.

माहिती सौजन्स – ऑपइंडिया वेबपोर्टल

**

Back to top button