HinduismNews

साधू हत्याकांड प्रकरणी ४७ आरोपींना कोर्टाकडून जामीन मंजूर

मुंबई, ८ डिसेंबर – दोन साधूंची हत्या पालघरमध्ये करण्यात आली होती. सोमवार, ७ डिसेंबर रोजी या प्रकरणातल्या ४७ आरोपींना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर ४७ जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात या प्रकरणातल्या ५८ जणांना जामीन मंजूर करण्यात आला होता. पालघर येथील गडचिंचले येथे एप्रिल महिन्यात दोन साधूंची हत्या झुंडीने केलेल्या मारहाणीत झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी २०० लोकांना अटक केली होती. त्यापैकी आजवर १०५ जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button