पंढरीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा प्रत्येक टप्पा भक्तीचा नवा सोहळा घडवतो. बरड ते नातेपुते हा प्रवास म्हणजे विठुरायाच्या दर्शनाची उत्कंठा शिगेला पोहोचल्याचा क्षण. सातारा जिल्ह्यातून सोलापूरच्या भूमीत प्रवेश करताच हरिनामाचा गजर, सेवाभाव आणि भक्तीचा उत्साह अधिकच बहरतो. दुतर्फा उभा असलेला समाज वारकऱ्यांचे स्वागत करतो, तर हरिनामाच्या गजराने आसमंत दुमदुमून जातो…