फाळणीची शोकांतिका समजून घेताना ब्रिटिशांचे राजकारण आणि समाजातील फूट यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. भारताच्या फाळणीमागे हीच फूट कारणीभूत ठरली. आज जगभरात चालणाऱ्या युद्धांचे धागेदोरे अशाच फाळण्यापर्यंत गेलेले दिसतात. त्यामुळे भारतासाठी विभाजन विभीषिका स्मृतीदिन केवळ दुःख व्यक्त करण्याचा दिवस नसून, तो फुटीरतावाद्यांचे डाव ओळखण्याचा आणि एकता, अखंडतेचा जागर करण्याचा दिवस असायला हवा.