भंडीशेगावहून निघालेली माऊलींची पालखी आता पंढरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचते. बाजीरावच्या विहिरीवरील दुसरे उभे आणि चौथे गोल रिंगण भक्ती, परंपरा आणि उत्साहाचे अद्वितीय दर्शन घडवतात. धुळीत मिसळलेली भक्ती, टाळ-मृदंगाचा निनाद आणि “ज्ञानबा-तुकाराम”चा अखंड गजर संपूर्ण वातावरण चैतन्यमय करतो. वाखरी येथे दोन पालख्यांचा दिव्य संगम घडताच, प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणात विठ्ठलभेटीची ओढ शिगेला पोहोचते. पंढरी आता केवळ काही पावलांवर उभी असते…