पंढरीच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांची आणि संतांचे फलटणमध्ये उत्साहात स्वागत होते, त्यांची सेवा केली जाते. मुक्कामाच्या टप्प्यावर होणारी समाज आरती, चोपदारांच्या इशाऱ्यावर क्षणार्धात पसरणारी शांतता आणि “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल”चा जयघोष… हा अनुभव प्रत्येक वारकऱ्याच्या मनात कायमचा कोरला जातो.