गणेशोत्सवादरम्यान बाप्पाच्या चरणी अर्पण केलेली फुले नंतर निर्माल्य म्हणून मोठ्या प्रमाणात जमा होतात. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ शकतो. मात्र, निर्माल्यावर योग्य प्रक्रिया केल्यास त्याचा पर्यावरणासाठी आणि समाजासाठीही उपयुक्त वापर होऊ शकतो, हे दाखवून दिलं आहे केशवसृष्टीच्या अनोख्या उपक्रमाने. शेकडो टन निर्माल्यापासून खत, अगरबत्ती आणि धूपकोन तयार करून महिलांना रोजगार मिळवून देणाऱ्या उपक्रमाबद्दल जाणून घेऊया.आपण ही या उपक्रमात सहभाग घेऊ शकता…